लोकशाही जिवंत .. .... तर विनाश अटळ ३९९
।
र् नाव व घटना अगोदरच तयार करून ठेवली होती. नागपूरला
३ फे जंगी परिषदा भरविण्याचे आणि फेडरेशनची स्थापना व घटना
|वुयार करण्याचे ठरविण्यात आले. हे सर्व सोपस्कार बाबासाहेबांनी अगोदरच
क केलेले होते. फक्त त्याला कायदेशीर स्वरुप या वेळी मिळाले. या
क्लीन परिषदांची नावे अशी :
| (१) ऑल इंडिया डिप्रेस्ड क्लासेस कॉन्फरन्स, थर्ड सेशन, १८ व १९ जुले
| १९४२.
| (२) ऑल इंडिया डिप्रेस्ड क्लासेस वुईमेन्स कॉन्फरन्स्, २० जुले १९४२.
|
| |. (३) समता सैनिक दल कॉन्फरन्स्, २० जुलै १९४२.
|» या तिन्ही परिषदेस सुमारे पाऊण लाख लोक उपस्थित होते. त्यात सुमारे
| ३७ हजार स्त्रिया होत्या. नागपूर येथील मोहन पार्क येथे नागपूरकरांनी
| बैरिषदासाठी प्रचंड मंडप उभारला होता. त्याला आंबेडकर, हरदास, काळू
| आहेरे व रमाबाई यांच्या नावाचे चार बाजूंनी चार दरवाजे होते. १८ व १९ जुलै
| १९४२ च्या तिसऱ्या अधिवेशनासाठी अध्यक्ष म्हणून बाबासाहेबांची अगोदर निवड
| करण्यात आली होती. परंतु त्यांना ९ जुलैच्या हुकुमान्वये व्हाईसरॉयच्या
| मंत्रिमंडळात घेतल्यामुळे, त्यांना अध्यक्षपद भूषविता आले नाही. ते पद मद्रासचे
$ रावबहादूर एन. शिवराज, एम. एल. ए. (सेंट्रल), मद्रास लॉ कॉलेजचे प्रोफेसर
| आणि किंग्ज-कमिशन कमिटीचे सभासद यांना देण्यात आले. बाबासाहेब
| आणि शिवराज आणि त्यांचे सहकारी नागपूरला १८ जुलैला सकाळी ९ वाजता
| आगगाडीने येऊन पोहोचले, तेव्हा प्रचंड मिरवणूक स्टेशनपासून मोहन पार्क
हँटिलपर्यंत काढण्यात आली. समता सैनिक दल व त्यांचा बँड अग्रभागी
हैते सन्माननीय मंडळी हॉटेलमध्ये चार दिवस राहिली.
दी ऑल. इंडिया डिप्रेस्ड क्लासेस कॉन्फरन्सूचे अध्यक्ष रावबहादूर एन. | शिवराज, बी. ए. बी.एल., एम. एल. ए. (सेंट्रल) हे होते. दी ऑल इंडिया
| डिप्रेस्ड क्लासेस वुईमेन्स अधिवेशनाच्या अध्यक्षा सौ डोंगरे (अमरावती) या | कोत्या. दी समता सैनिक दल कॉन्फरन्सूचे अध्यक्ष-गोपाळसिंह, एच. बी. ई.,
| एम. एल. ए. (पंजाब) हे होते. या तीन परिषदांचा इंग्रजी अहवाल (पाने १२१),
क्षी जी टी. मेश्राम, तिसऱ्या अधिवेशनाचे स्वागताध्यक्ष यांनी ७-९-१९४२
ज्ञा ' मंगलधाम ' इंदोरा येथे प्रसिद्ध केला.
| राजकीय स्वरुपाचे जे पाच ठराव झाले त्यात (१) क्रिप्स योजना अस्पृश्यांना
ह्रापसंत आहे, (२) घटना परिषद लवकर भरविण्यात यावी याबद्दल मागणी,
३) अस्पृश्यांच्या संरक्षणाची तरतूद घटनेत करण्याबद्दल मागणी. अस्पृश्यांच्या
हिताची कामे करण्याबद्दल एक मोठी रक्कम प्रत्येक वर्षी अंदाजपत्रकात मंजूर