१९८ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे
वाचनाच्या वेळी त्यांनी ' मी सक्तीच्या तडजोडीच्या ऐवजी ऐच्छिक तडजोडच
योजणार आहे ' असे स्पष्ट करून सांगितले. यावरून असे दिसते की सर
रॉबर्ट बेल ह्यांना देखील १९३४ साली जारीच्या तडजोडीची काही जरूरी भासली
नाही. त्यावेळी मि. सकलातवाला हे हजर होते व त्यांनाही जारीच्या तडजोडीची
जरूरी त्या वेळेस भासली नाही. त्यांना जारीच्या तडजोडीची जरूरी भासली
नाही, इतकेच नव्हे तर त्यांनी अशाप्रकारच्या कायद्यांची काही एक जरूरी नाही
असे स्पष्टपणे सांगितले.
१९३४ साली जर सक्तीच्या तडजोडीची गरज भासली नाही तर हल्ली अशी
काय परिस्थिती झाली आहे की त्यामुळे सरकारला तो कायदा बदलून जारीची
तडजोड प्रस्थापित करण्याची जरूरी भासवी ? जारीच्या तडजोडीचे समर्थन
करताना मुख्यप्रधानांनी काही संपाचे आकडे देऊन असे दाखविले की, सध्या
हिंदुस्थानात वारंवार व गंभीर स्वरूपाचे असे संप होत असल्यामुळे ऐच्छिक
तडजोडी ऐवजी सक्तीच्या तडजोडीची योजना करण्याची जरूरी उत्पन्न झाली
आहे. परंतु मी, संपाचे आकडे, त्यांच्यात भाग घेतलेल्या कामकरी लोकांची
संख्या व फुकट गेलेल्या कामाचे दिवसांची संख्या ह्यांचा अभ्यास काळजीपूर्वक केला असल्यामुळे मला मुख्यप्रधानांचे समर्थन पटत नाही. लेबर ऑफिसने . प्रसिद्ध केलेल्या लेबर गॅझेटमध्ये मुंबई प्रांतात झालेल्या संपाचे आकडे दिले आहेत. त्यात १९२१ ते १९३७ पर्यंतच्या काळात झालेले संप, त्यात भाग घेतलेल्या कामकऱ्यांची संख्या व फुकट गेलेल्या दिवसांची संख्या इत्यादी गोष्टी सविस्तरपणे दिलेल्या आहेत. ह्या आकड्यांवरून दृष्टी फिरवली असता, संपाची संख्या प्रत्येक वर्षी कमी कमी होत चालली आहे असेच कोणलाही दिसून येईल. १९२१ साली मुंबई प्रांतात एकंदर १०३ संप झाले, १९२२ ला संपाची संख्या १४३ होती व १९२३ ला १०९ होती, त्यानंतर १९२४ व १९२७ ह्या काळात संपाची संख्या ५० पर्यंत खाली उतरली. म्हणजे संख्येच्या दृष्टीने संपाची संख्या शेकडा ५० ने कमी झाली. १९२८ साली संपाची संख्या ११४ पर्यंत गेली व १९२९ ते १९३७ ह्या काळात संपाची संख्या ८८ ते ५३ च्या दरम्यान होती. उद्योगधंद्यात उत्पन्न झालेली क्षुब्धता संपाच्या संख्येवरूनच बरोबर मोजता येणार नाही. संपाची संख्या जरी लहान दिसत असली तरी संप करणाऱ्या कामकऱ्यांची संख्या व फुकट गेलेल्या दिवसांची संख्या तुलनात्मक दृष्टीने मोठीच आहे, हे ह्या कोष्टकात दिलेल्या आकड्यांवरून आढळून येते. संपाचे दिवस व कामगारांची संख्या यावरूनच उद्योग धंद्यातील अस्वरथतेचे मापन केले पाहिजे. या दृष्टीने १९२८ हे सर्वात वाईट गेलेले वर्ष होते.