१६५
अन्याय करणाऱयांना स्वराज्य मागण्याचा
काय हक्क ?
| त्ता. २६ डिसेंबर १९३९ रोजी सकाळी १० वाजता बेळगाव म्युनिसीपालिटीने
खु बाबासाहेब आंबेडकर यांना मानपत्र दिले. त्या मानपत्रास डॉ. बाबासाहेब
र् बर देताना म्हणाले,
जेथे होणाऱ्या स्वतंत्र मजूर पक्षाच्या परिषदेचा अध्यक्ष म्हणून मला आज ह्लयाकाळी भाषण करावेच लागणार आहे. आपणापैकी ज्या कोणास माझी
झिकीय भूमिका समजून घ्यावयाची जिज्ञासा असेल ते सर्व लोक त्या परिषदेस
बर राहातील असे मला वाटते. अशा परिस्थितीत मी येथे सविस्तर भाषण कण्याची आवश्यकता नाही. आपण मला जे आज मानपत्र दिले आहे त्याबद्दल
आपला आभारी आहे. आजपर्यंत राजकीय कार्यकर्त्यांना जी मानपत्रे आपण
ती सर्वानुमते देण्यात आली नाहीत असे समजते. पण मला देण्यात
मानपत्र मात्र सर्वानुमते देण्यात येत आहे असे समजते, या करप बेळगाव म्युनिसीपालिटीच्या सर्व पक्षांच्या सभासदांचे मजवर
ज्य प्रेम आहे, असे मानण्याचे कारण नाही. माझ्या जोतिबाला तेल वण्यात तुमच्या खंडोबाला आमच्या लोकांनी भंडारा लावावा असा हेतु असावा, सा माझा तर्क वाहतो. मी जे कार्य करीत आहे ते खरे म्हटले तर तुमचे कार्य
हे. तुम्ही पिढ्यानपिढ्या करून ठेवलेले पाप मला निस्तरावे लागत
हे या पापाची जबाबदारी माझ्यावर नाही, अस्पृश्यांवरही ती नाही. ती
गी आपणा स्पृश्यांवरच आहे. ही गोष्ट आपण विसरता कामा नये.
| हे पाप कायम ठेवून तुम्ही जी स्वराज्याची चळवळ करीत आहा व तुम्ही पूर्ण
गाची जी मागणी करीत आहा ती संशयास्पद वाटते, हे मी तुम्हास स्पष्ट
आहे. अस्पृश्यांना पिण्यास पाणी मिळत नाही, त्यांना लोकसंख्येच्या
नाने नोकऱ्या मिळत नाहीत वगैरे अन्यायाची सर्व जबाबदारी तुम्हावरच
झह. दुसऱ्यास नाडणान्या तुम्हास स्वराज्य मागण्याचा कास हक्क आहे, हे
हला समजत नाही.
: ३० डिसेंबर १९३९.