बौद्ध धर्मामुळेच भारत देश महान २०३
या प्रश्नांची उत्तरे तुम्ही दिलीच पाहिजेत. कोणता धर्म चांगला व कोणता धर्म वाईट हे आतापर्यंत तुम्ही ओळखलेच असेल. ज्यांना विचार, शिक्षण व स्वातंत्र्य लाभले नाही ते हिंदू संस्कृतीस कशी मान्यता देतील. शूद्रांना ब्राह्मण, क्षत्रिय व वैश्य यांची फक्त चाकरी करण्यास सांगितले होते.
आश्चर्याची गोष्ट अशी की हे ब्राह्मण कधीच राज्यकर्ते बनले नाहीत. राज्य करणारे लोक नरकात जातात अशी ब्राह्मणांची समजूत होती. ब्राह्मण लोकांना नरकाची मोठी भीती वाटते, म्हणून क्षत्रियांना राज्य करण्याची ब्राह्मणांनी मुभा दिली. तेव्हा या सौद्यात शूद्र आणि अस्पृश्य कसे भागीदार ठरतील ? आपण अस्पृश्य म्हणून हिंदू धर्मात राहावयाचे की धर्म बदलावयाचा या संबंधी विचार करण्याची वेळ आता आली आहे. मला व्यक्तिशः हिंदुंचा मग्रूरपणा व विषमता मुळीच मान्य नाही. बौद्ध धर्म व हिंदू धर्म यात केवढा तरी फरक आहे. बौद्ध धर्मे जातीविरहित एकजिनशी समाजरचनेचा पुरस्कार करतो तर हिंदू धर्म जातीवरच मुख्य अधिष्ठान ठेवतो. हिंदुंच्या हरेक जातीमध्ये चिरेबंदी भिंत घालून विभागणी करण्यात आली आहे.
दरेक़ व्यक्तिमात्रास, समाजास व सरकारास धर्माची आवश्यकता आहे. हे कोणीही नाकारू शकणार नाही. खऱ्या धर्माशिवाय कोणाचीही प्रगती होणार नाही. तेव्हा कोणता धर्म श्रेयस्कर हे तुम्ही ठरविले पाहिजे. बौद्धवाद व ब्राह्मणवाद यामधील फरक व भेद नीट लक्षात ठेवण्यास [मी ] [तुम्हास ] [सांगत ] आहे. यापैकी एकाची तुम्हास निवड करावयाची आहे. बुद्ध हा मानव होता. बुद्धाची तत्त्वे जातीय वर्गाविरुद्ध होती. बुद्धाने सामान्य जनतेत वास्तव्य केले आणि मानवी दृष्टिकोनातून जनतेची दु:खे दूर करण्याचा [प्रयत्न ] केला. तेव्हा आजपासून कोणता धर्म तुम्हास उपकारक आहे, [हे ] [तुम्हास ] ठरवावयाचे आहे आणि ते स्वातंत्र्य तुम्हास निर्विवादपणे आहे. .
७ 9 ®