१४/१५-१०-१९५६ बुद्ध धर्मानेच जगाचा उद्धार होणार आहे - Page 522

३४२

बुद्ध धर्मानेच जगाचा उद्धार होणार आहे

' भारतीय बौद्धजन समितीचे प्रवर्तक आणि अध्यक्ष, भारतातील दलित जनतेचे कंठमणी, आंतरराष्ट्रीय किर्तीचे घटना-पंडित, अखिल भारतीय शेड्यूल्ड कास्ट्स्‌ फेडरेशनचे संस्थापक आणि कर्णधार परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी येत्या १४ ऑक्टोबर १९५६ च्या सकाळी ८ वाजता नागपूर येथे बौद्ध धर्म दीक्षा घेण्याची महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा

संदेश

२६, अलीपूर रोड,

दिल्ली, ता. २३ सप्टेंबर १९५६

बौद्ध धर्म स्वीकारण्याचा दिवस व ठिकाण मी आता निश्‍चित

केले आहे. येत्या दसऱ्यास तारीख १४ ऑक्टोबर १९५६ रोजी

नागपूर येथे मी धर्मांतर करणार आहे.

या दिवशी सकाळी ९ ते ११ वाजता माझा धर्म-दीक्षा विधी

समारंभ होईल व संध्याकाळी माझे सर्व लोकांसाठी

जाहीर व्याख्यान होईल.

बी. आर. आंबेडकर,

२३ सप्टेंबर १९५६.

' प्रबुद्ध भारत ' च्या संपादकांना एक विशेष संदेश डॉ. बाबासाहेबांनी पाठविला असून बौद्ध धर्म स्वीकारावयाचा वर दिलेला दिवस, तिथी आणि समय कळविला आहे.

विजयादशमीचा मुहूर्त धर्मदीक्षेसाठी साधण्यात अत्यंत औचित्य आहे. विजया- दशमी ही महान बौद्ध सम्राट अशोकाच्या विजयाचा दिन म्हणूनच पाळली जाते. अलिकडील तिनशे वर्षात पावसाळ्याच्या समाप्ती नंतर मराठे सीमोल्लंघन या विजयादशमीला करीत असत. अस्पृश्य आणि दलित समाजाच्या डोक्यावर