२०-११-१९५६ बुद्ध की कार्ल मार्क्स - Page 582

३४७

बौद्धधर्म व मार्क्सवाद [† ]

' काठमांडू येथील विश्व बौद्ध परिषदेच्या समाप्तीपूर्वी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे प्रतिनिधींना उद्देशून एक खास भाषण दि. २० नोव्हेंबर १९५६ ला ठेवण्यात आले होते. व्याख्यानाचे स्थळ नेपाळचे वैभवशाली राजदरबार होते. बौद्ध धर्म भारतात अस्तंगत झाल्यावर तो कित्येक वर्षे नेपाळमध्ये भरभराटीत होता परंतु आज मात्र तेथे मनुप्रणीत विषमतेवर आधारलेला हिदू धर्म कायदेशीर रीतीने जारी आहे. अशा देशाच्या दरबारात बाबासाहेबांनी बौद्ध धर्माच्या सर्व श्रेष्ठतेचा पुरस्कार करणे ही एक अपूर्व क्रांतिकारक घटना होती. या भाषणात बौद्ध धर्माकडे पाहाण्याचा आपला मूलभूत दृष्टिकोन त्यांनी दिग्दर्शित केला आहे

दिनांक २० नोव्हेंबर १९५६ रोजी विश्व बौद्ध परिषदेच्या शेवटच्या दिवशी विश्व बौद्ध परिषदेचे. अध्यक्ष डॉ. जी. पी. मलालशेखर (सिलोन) यांनी बाबासाहेबांना विनंती केली की, त्यांनी ' बौद्ध धम्मात अहिंसेचे स्थान ' या विषयावर भाषण द्यावे. ही विनंती बाबासाहेबांनी स्वीकारली परंतु विश्व बौद्ध परिषदेतील बहुसंख्य प्रतिनिधींनी आग्रह केला की, बाबासाहेबांनी” ' बौद्धधर्म व मार्क्सवाद ' यावर भाषण द्यावे.बाबासाहेबांनी याच विषयावर बोलण्याचे मान्य केले. विश्व बौद्ध परिषदेच्या समारोप समारंभाचा आरंभ दुपारी ३ वाजता होणार होता. त्याप्रमाणे काही वेळ अगोदर बाबासाहेब निर्धारित स्थळी आले. बाबासाहेब येताच विश्व बौद्ध परिषदेचे माजी अध्यक्ष व ब्रह्मदेश सुप्रिम कोर्टाचे मुख्य न्यायाधीश ऊ चॉन टून व त्यांच्या पत्नी यांनी बाबासाहेबांना आदरपूर्वक त्या भव्य अशा मंचाकडे नेले. बाबासाहेबांना सर्व प्रतिनिधींनी सन्मानपूर्वक उत्थापन दिले. बाबासाहेब खुर्चीवर बसले. स्टेजवर नेपाळचे राजे महेंद्र वीर विक्रम सहदेव एका सजवलेल्या खुर्चीवर विराजमान झाले. बाजूला पूज्य चंद्रमणी महास्थविर, जी. पी. मलालशेखर, पूज्य अमृतानंद महास्थविर आणि ऊ चॉन टून स्थानापन्न झाले. प्रथम पूज्य चंद्रमणी. यांनी उपस्थितांना त्रिशरण व पंचशील दिले. त्यानंतर विश्व बौद्ध परिषदेचे अध्यक्ष डॉ. जी. पी. मलालशेखर माईकवर आले आणि म्हणाले,

“ आजच्या विश्व बौद्ध परिषदेमध्ये भगवान बुद्धाच्या भारतभूमीमधून एक महान पुरुष आलेला आहे. त्याचे नाव आहे डॉ. बी. आर. आंबेडकर (प्रचंड टाळ्या). त्यांनी भारतातील नागपूर मुक्कामी पाच लाख पददलित लोकांना बौद्ध धम्माची

1 शीर्षक दुरुस्ती - प्रथम आवृत्तीत अनवधानाने शीर्षक दिले गेले होते. ते मूळ प्रबुद्ध

भारतानुसार दुरुस्त केले आहे.

* प्रबुद्ध भारत : ३ ऑगस्ट १९५७.