५५
ज्या देवाला गुरें मारणें शक्य आहे त्याला माणसें
मारणेच कां अशक्य असावे ?
नाशिकचे श्री. गायकवाड । यांचें पत्र * दुसरीकडे दिलें आहे त्यावरून बहिष्कृतांना खेड्यापाड्यांमध्यें किती जुलूम व अन्याय सोसावा लागतो त्याची थोडी तरी कल्पना येईल. गांवांत इतरांच्या गुरांबरोबर खुद्द महारांचींहि गुरें मरत होतीं, ही एकच साधी गोष्ट, महारांना गुरें मारण्याचे चेटूक करणें शक्य आहे असें मानलें तरी, महारांचा त्या बाबतींत कांहीं संबंध नव्हता हें शाबीत करण्यास पुरेशी होती. परंतु महारांना वाटेल तशी मारहाण केली तरी हरकत नाहीं, त्यांची दाद कोण घेणार ? अशीच समजूत असल्यामुळें गांवच्या लोकांनीं महारांना यथेच्छ मारहाण करून स्वतःच्या मनाचें समाधान करून घेतलें ! महारांचा देव जर खरोखर ' कर्तुमकर्तुम् ' शक्तिमान् असता तर त्यांना इतका अन्याय व जुलूम इतकीं शतकें कां सोसावा लागला असता ? ज्या देवाला गुरें मारणें शक्य आहे त्याला माणसें मारणेंच कां अशक्य असावें ? बहिष्कृतांना अज्ञान म्हणणारे लोकच स्वतः किती अज्ञान असतात, त्यांच्यामध्ये रानटी लोकांच्या समजुती कशा प्रचलित आहेत, तें दिंडोरी तालुक्यांतल्या प्रस्तुत उदाहरणावरून स्पष्टपणें दिसून येतें. कित्येक क्षत्रियकुलावतंसांनीं केलेल्या मारहाणीमुळें बहिष्कृत वर्गातली. सात निरपराधी माणसें दिंडोरी येथल्या दवाखान्यांत जखमी होऊन पडलीं | आहेत. या बाबतीत तिकडील पोलीस योग्य ती तजवीज करून अपराध्यांना
कडक शासन करावयाला लावील काय? नाशिक जिल्ह्याच्या वरिष्ठ
अधिकाऱ्यांचे इकडे लक्ष जाईल आणि आडमुठ्या गांवगुंडांना योग्य ती शिक्षा होऊन, इतरांना दहशत बसेल अशी आम्हांस उमेद आहे.
eco
t पाहा, परिशिष्ट क्रमांक २२..
३: पाहा, परिशिष्ट क्रमांक २३.
आजकालचे प्रश्न : बहिष्कृत भारत, ता. १२ ऑगष्ट १९२७.