महार आणि त्यांचे वतन २५५
बिगारी ; (४१) मडक्यांच्या बिगारी ; (४२) टिकावांच्या बिगारी ; (४३) फावड्यांच्या अशा एकूण ४३ प्रकारच्या बिगारींची यादी दिली आहे. खरे पाहिलें असतां सरकारी पार्सल किंवा दप्तर याची ने आण करणे येवढाच काय तो वेठबिगारीचा व्याप कायद्याच्या दृष्टीने असू शकतो. पण या वेठबिगारीच्या बाबतींत किती आंदाघुंदी चालते हे वरील यादीवरून उघड होत आहे. सरकारी कामाचा तींत कोठे मागमूसहि नाही. या कामी अधिकाराचा इतका दुरुपयोग व इतकी बेदाद करण्यात येत आहे की सरकारी काम बाजूस राहून वेठबिगारी म्हणजे आल्यागेल्या अंमलदारांच्या खाजगी सामानाची वाहतूक याशिवाय त्यांत दुसरे कांहीच उरले नाही.
या बिगारी घेऊन जाण्याचे टप्पेहि कांही जवळचे नाहीत. नगर देवळें येथील लोकांना बिगार नेण्याची ठिकाणे म्हणजे (१) देवळे ते मटाणे ; (२) देवळे ते बिलेवाडी ; (३) देवळे ते AER ; (४) देवळे ते भाटवडे ; (५) देवळे ते पिंपळगांव ; (६) देवळे ते वासारी ; व (७) देवळे ते वाजगांव. देवळें पासून ही गावे कांही हांकेवर नाहीत. मटाणे खेरीजकरून बाकीची सर्व गांवे देवळेपासून अजमासे ५ मैल आहेत. यावरून उघड आहे की बिगारीची नेआण करण्याकरिता या महारांना १० मैल मकान पायाखाली तुडवावे लागते. सरकारी कामे निश्चित नाहीत ती नाहीत. पण सरकारच्या अनेक खात्यांपैकी कोणत्या खात्यांची कामे महारांनी करावयाची हे तरी निश्चित असावयास पाहिजे होते. पण तसेहि सरकारकडून अद्यापी करण्यात आलेले नाही. खालच्या प्रतीचा जरी कामगार झाला तरी ज्या खात्यांत त्याची नेमणूक झाली असेल त्या खात्याच्या बाहेरील काम त्यास कोणी सांगत नाही. न्याय खात्यांतील शिपायाला कोणी अबकारी खात्यांतले काम सांगत नाही. रेव्हेन्यु खात्यांतल्या शिपायास कोणी पोलिस खात्यांत कामगीरीवर पाठवित नाही. परंतु कामगार महाराच्या बाबतींत हा नियम मुळींच लागू केलेला दिसत नाही. वसुलीच्या बाबतीत महाराला तो रेव्हेन्यु खात्याचा शिपाई म्हणून राबविला जातो. जन्ममृत्यूच्या नोंदणीच्या प्रसंगी तो आरोग्य खात्याचा शिपाई म्हणून धरला जातो. मोजणीच्या वेळी सर्वे सेटलमेन्ट खात्यांत त्याला जमा केला जातो. जंगलासंबंधी कामे करतांना तो फॉरेस्ट खात्याचा शिपाई गणला जातो. कोंडवाड्याच्या कामी पोलीस खात्यांत त्याची हजेरी लागते. कोणतेंहि नवे खाते उघडण्यात आले
आणि त्याला गांवगन्रा शिपायाची जरुरी लागली की महाराला बोलावणे आलेच
म्हणून समजावे. एकूण हे उघड आहे की एकरूपी महारास बहुरूप्याचे सोंग घेण्यास लाऊन त्याच्याकडून सरकार अनेक कामे बीनधास्त करवून घेते. हा अन्याय आहे हे कोणालाहि कळण्यासारखे आहे. खुद्द इंग्रज अंमलदारांच्या