३३४ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे
खरें असेल तर तसें न होण्याची खबरदारी पुणेंकरांनी आतांपासूनच घ्यावी हें बरें लायकी नालायकी न पहातां केवळ मातंग समाजाची कोठें तरी वर्णी लावावयाची असेंच जर असेल तर रा. सकटापेक्षां रा. लोखंडे यांना तो मान मिळणे उचित आहे असें आम्हांस वाटतें.
आजकालचे प्रश्न : बहिष्कृत भारत, ता. ३ फेब्रुवारी १९२८.